IND VS SA WORLD CUP : 'या' पाच कारणांमुळे भारताचा द. आफ्रिकेविरुद्ध पराभव
पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२२ टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज (दि. ३०) दक्षिण आफ्रिकेने भारताचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. (IND VS SA WORLD CUP) अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाला शेवटच्या षटकात पराभव पत्करावा लागला. द. आफ्रिकेने भारतीय संघाचा पराभव केला असला तरी भारतीय संघाची उपांत्य फेरीची आशा कायम आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांग्लादेश आणि झिम्बाब्वेचा पराभव करावा लागणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाला अनेक मोठ्या चुका कारणीभूत ठरल्या आहेत. पुढील ५ मोठ्या चुकांमुळे भारतीय संघाला पराभवाला समोरे जावे लागले आहे. जाणून घेऊया ही कारणे कोणती आहेत…
१. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पर्थच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करणे कठीण असते. या खेळपट्टीवर सुरूवातीला बॉल स्वींगही होत होता. त्यामुळे रोहितचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे बोलले जात आहे. तर सामन्यात दीपक हुड्डाला संधी देण्यात आली होती. मात्र, दीपक हुड्डा भोपळाही फोडू शकला नाही. (IND VS SA WORLD CUP)
२. सलामीवीरांची खराब कामगिरी
गेल्या काही सामन्यांपासून भारतीय सलामीवीरांना चांगली सुरूवात करता आलेली नाही. के.एल. राहुल १० धावांचा आकडाही पार करू शकलेला नाही. तर रोहित शर्मा फॉर्ममध्ये असूनही १५ धावाच करू शकला. भारताचे सलामीवीर पहिल्या विकेटसाठी २५ भागिदारी करू शकले. (IND VS SA WORLD CUP)
३. मध्यक्रमाकडून साथ मिळाली नाही (IND VS SA WORLD CUP)
भारताचे सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर मध्यक्रमालाही चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहली १२ धावा करू शकला. तर विश्वचषकात पहिला सामना खेळत असलेल्या दीपक हुड्डाला भोपळाही फोडता आला नाही. सूर्यकुमार दमदार अर्धशतकी खेळी केली नसती तर भारतीय संघाला १३४ धावांचे आव्हानही देता आले नसते. (IND VS SA WORLD CUP)
४. मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश
द. आफ्रिकेने सुरूवातीचे झटके दिल्यानंतर भारताचा निम्मा संघ ५० धावांच्या आतच गारद झाला होता. सूर्यकुमारच्या खेळीने भारतीय संघ १३३ धावांपर्यंत पोहचू शकला. मात्र, भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचण्यासाठी २५-३० धावा कमी पडल्या. ज्यामुळे द. आफ्रिकेच्या संघावर दबाव वाढला असता. (IND VS SA WORLD CUP)
५. भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण (IND VS SA WORLD CUP)
या सामन्यात भारतीय संघाचे अतिशय सुमार क्षेत्ररक्षण पहायला मिळाले. मार्करमला बाद करण्याच्या दोन संधी भारतीय संघाने गमावल्या. १३ व्या षटकात अॅडम मार्करमला धावबाद करण्यात रोहित शर्माला अपयश आले. तेव्हा मार्करम ३६ धावांवर फलंदाजी करत होता. तर रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत असतानाही सोपा झेल पकडण्यात अपयश आले. (IND VS SA WORLD CUP)
It went down to the wire, but David Miller saw South Africa through in a tense run chase in Perth 😯#INDvSA Report 👇#T20WorldCuphttps://t.co/8RDVG5ExqN
— ICC (@ICC) October 30, 2022
For a fiery spell that broke the back of India’s batting order, Lungi Ngidi is the @aramco POTM 👏 pic.twitter.com/nfElPCJO3t
— ICC (@ICC) October 30, 2022
A thrilling win for South Africa and it takes them to the top of the table in Group 2 💪#INDvSA | #T20WorldCup | 📝: https://t.co/uficuiMq0H pic.twitter.com/0TLFpUmAd7
— ICC (@ICC) October 30, 2022
हेही वाचलंत का?
- Morbi Bridge Accident : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! केबल ब्रीज तुटल्याने ६० जण ठार
- Virat Kohli In T20 World Cup : विराट कोहलीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद , टी-२० वर्ल्डकपमध्ये १ हजार धावा पूर्ण
- Shoaib Akhtar On Indian Team : भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तर भावुक; म्हणाला, ‘तुम्ही तर पाकिस्तानचं’