IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात तब्बल ९ वर्षांनी जिंकली टी-२० मालिका; भारताचा ६ गडी राखून विजय | पुढारी

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात तब्बल ९ वर्षांनी जिंकली टी-२० मालिका; भारताचा ६ गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील निर्णायक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. निर्णायक सामन्यात विजय मिळवून भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध तब्बल ९ वर्षाने मालिका जिंकली. यापूर्वी भारताने मायदेशात २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका जिंकली होती. (IND vs AUS)

मालिकेतील निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे आव्हान दिले होते. विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला. १८७ धावांचा पाठलाग करताना सुर्यकुमार यादव ३६ चेंडूमध्ये ६९ तर विराट कोहलीने ४८ चेंडूमध्ये ६३ धावांची खेळी केली. विराट आणि सुर्यकुमार यादव यांच्याशिवाय हार्दिक पंड्याने अंतिम षटकांत केलेल्या फटकेबाजीने भारतीय संघाला सहरित्या विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्सने २ तर जॉश हेजलवुड आणि पॅट कमिंसने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (IND vs AUS)

तत्पूर्वी, मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे आव्हान दिले आहे. कॅमरॉन ग्रीन २१ चेंडूमध्ये ५२ आणि टीम डेव्हिडच्या २७ चेंडूमध्ये ५४ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला १८६ धावा करण्यात यश आले. कॅमरॉन ग्रीन आणि टीम डेव्हिड शिवाय जोश इंग्लिसने २२ चेंडूमध्ये २४ धावा केल्या. आता भारताला मालिका विजयसाठी १८७ धावांची गरज आहे. पॉव्हरप्ले नंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या संथ झाली होती. यानंतर टीम डेव्हिडने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.शेवटच्या षटकांत डॅनियल सॅम्स आणि टीम डेव्हिड यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १८६ धावांपर्यंत पोहचवली.

रोहित शर्माचा प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. ऑस्ट्रेलियाला १८६ धावांपर्यंत रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले आहे. भारताकडून अक्षर पटेलने ४ षटकांमध्ये ३३ धावा देत ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला संथ केले. तर यजुवेंद्र चहलने ४ षटकांमध्ये २२ धावा देत १ विकट पटकावली. तर भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलने प्रत्येकी १ विकेट पटकावली. (IND vs AUS)

हेही वाचलंत का?

Back to top button