काळजीचे कारण नाही दोन दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला : जयंत पाटील | पुढारी

काळजीचे कारण नाही दोन दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काल बुधवारी दुपारी ब्रिज कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईत दुपारी मंत्री मंडळातील नेत्यांची बैठक होती. राज्यात आलेल्या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. या संदर्भात जयंत पाटील यांनी आज सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.

‘आज ब्रीच कँडी रुग्णालयात माझी अँजिओग्राफी चाचणी झाली असून त्यात कोणताही दोष आढळलेला नसल्याने काळजीचे कारण नाही. दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर लगेचच जनसेवेत रुजू होण्याचा माझा मानस आहे. आपण व्यक्त केलेल्या संवेदनांप्रती मी आपला आभारी आहे.’ अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन दिली आहे.

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार

सांगलीत कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे. ती आणखी कमी होत आहे. सध्या कोयना धरणात पाणी साठा ९० टीएमसी असून (८७%) धरणातून ३०००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

रुग्णालयातून त्यांनी सांगली पुरस्थितीचा आढावा घेतला आहे.

पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणी साठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवतां येईल.

मुळे कोयना धरणातून सद्याचा ३०००० विसर्ग थोडासा वाढवून ५०००० क्यूसेक्स करण्याचे नियोजन आहे. तसेच सांगली येथे कृष्णाची पातळी काही प्रमाणात वाढेल परंतू घाबरण्याचे कारण नाही. मोठा पाऊस जर आला तर तो धरणांतच अडवण आवश्यक आहे. अशी माहिती जयंत पाटील यांनी सकाळी ट्विट करुन दिली आहे.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

पाणी ओसरतय, कोल्हापूरकर तरीही काळजी घ्या…….!

Back to top button