बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही : आनंद परांजपे | पुढारी

बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही : आनंद परांजपे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : खारेगाव उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यावरून शनिवारी रंगलेल्या राजकीय आखड्याचा दुसरा अंक रविवारी पुन्हा पाहायला मिळाला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर वय वाढले म्हणजे परिपक्वता येत नाही अशी वैयक्तिक टीका केली होती. श्रीकांत शिंदे यांच्या टिकेला राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी देखील पत्रकार परिषदेत शिंदे यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. आव्हाड यांनी बापाच्या भूमिकेने सांभाळून घेण्याचे वक्तव्य केले होते मात्र बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही असा टोला परांजपे यांनी श्रीकांत शिंदे यांना लगावला आहे.

खारेगाव उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर आधी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नंतर खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेतली. श्रीकांत शिंदे यांच्या टिकेला उत्तर देताना परांजपे म्हणाले, आपल्या भाषणात स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक टीका टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी शिंदे यांनीच पालकमंत्र्याचे आदेश धुडकवले आहेत.

खारेगावाच्या कामाचा उल्लेख करताना जितेंद्र आव्हाड यांचा घटनाक्रम चुकला असेल मात्र उड्डाणपुलाच्या आमचा पाठपुरावा आहे. हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितले आहे. श्रीकांत शिंदे यांना श्रेय घायचे आहेत त्यांनी ते श्रेय घ्यावे मात्र गृहनिर्माण मंत्र्यांवर, राष्ट्रवादी पक्षावर आणि कार्यकर्त्यांवर आघात झाला तर मी प्रतिउत्तत देणारच असे परांजपे यांनी स्पष्ट केले आहे.

महापौर कलियुगातील नारदमुनी..

जितेंद्र आव्हाड यांनी महापौरांना दिलेली नारद मुनींची उपमा ही योग्य होती. महापौर हे कलियुगातील नारद असल्याची टीका परांजपे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर केली आहे. सत्य युग, त्रेता युग अणि द्वापर नारद मुनींनी धर्माचे रक्षण करण्याचा प्रयन्त केला मात्र महापौर हे कलियुगातील नारद मुनी असून त्यांना दिलेली उपमा योग्य असल्याचे परांजपे यांनी सांगितले.

2014 नंतरच विकास नावाचे बाळ जन्माला आले का ?

श्रीकांत शिंदे यांनी खारेगाव उड्डाणपुलाचा पाठपुरावा करण्याबरोबर मतदार संघात विकास कामे झाली असल्याचा दावा केला आहे. मात्र यापूर्वीही विकास कामे होत होती. जर विकास झाला असेल तर कल्याण टर्मिनस, शिलफाटा, मानकोली मोठा गावं ब्रिज, दिवा उड्डाणपूल कधी होणार याची टाइम लाईन देखील खासदारांनी द्यावी असे आव्हानही परांजपे यांनी शिंदे यांना दिले.

हेही वाचलत का? 

Back to top button