पुढारी वृत्तसेवा
पावसापासून समुद्रापर्यंतचा हा नैसर्गिक प्रवास समजून घ्या.
दोन्हीही जलचक्राचा भाग आहेत. तरीही नदीचं पाणी गोड, तर समुद्राचं पाणी खारट असतं.
पावसाचं पाणी खडक आणि मातीमधून वाहताना सोडियम, क्लोराइडसारखी खनिजं विरघळवून घेतं. मात्र त्यांचं प्रमाण खूप कमी असतं.
नदीतील मीठाचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे ते आपल्या जिभेला खारट वाटत नाही.
नदीचं पाणी एका ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे त्यातील मीठ आणि खनिजं साचत नाहीत.
नद्या वाहत-वाहत शेवटी समुद्रात मिळतात आणि त्यांच्यासोबत खनिजं व मीठही समुद्रात पोहोचतं.
सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राचं पाणी वाफ बनत. पण मीठ समुद्रातच राहून जातं.
नद्या सतत मीठ समुद्रात आणतात आणि वाफेमुळे फक्त पाणी उडतं. त्यामुळे समुद्रात मीठ जमा होत राहतं.
समुद्रातील पाणी वाफ बनून ढग तयार होतात, पाऊस पडतो, नद्या वाहतात आणि पुन्हा मीठ समुद्रात पोहोचतं.
म्हणूनच नदीचं पाणी गोड आणि समुद्राचं पाणी खारं असतं!