औषधे अशी कडू का असतात व अशी चव औषधांना गरजेची आहे का?.औषधांमध्ये वापरले जाणारे घटक हे वनस्पतींमधून मिळवलेल्या संयुगांपासून बनवले जातात. त्यांची नैसर्गिक चव कडू असते. .चवींच्या संवेदनांमध्ये कडू चव ही शरीरासाठी एक प्रकारची संरक्षण यंत्रणा म्हणून कार्य करते. .मोठ्या प्रमाणात घेतल्यास, रोगांवर उपचार करणारी औषधेदेखील विषारी ठरू शकतात..कडू चवीमुळे आपण जे खात आहोत ते संभाव्यतः हानिकारक असू शकते, याची जाणीव आपल्याला होते..चवीसाठी औषधांमध्ये गोड पदार्थ मिसळल्यास, त्याचा सक्रिय घटकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते..त्यामुळे चवीपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते..औषधांची कडू चव कमी करण्यासाठी, ती गोड पेयासोबत घेणे, गोळ्या घेताना नाक बंद करणे असे उपाय केले जातात..लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.