'या' ८ प्रकारच्या व्यक्तींनी दररोज खाऊचे पान (विडा) खाणे टाळावे

पुढारी वृत्तसेवा

खाऊचे पान (विडा) खाणे ही भारतीय संस्कृतीतील एक जुनी परंपरा आहे, परंतु काही आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर नसते.

पोटाचे विकार असलेल्या व्यक्ती

ज्यांना वारंवार ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास होतो, त्यांनी दररोज पान खाणे टाळावे कारण यामुळे जळजळ वाढू शकते.

गर्भवती महिला

गरोदरपणात पानाचे सेवन करणे बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ते खाऊ नये.

उच्च रक्तदाब (High BP) रुग्ण

पानामध्ये वापरला जाणारा चुना आणि इतर पदार्थ रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

BP control diet

तोंडाचा अल्सर असल्यास

जर तुम्हाला तोंडात वारंवार फोड येत असतील, तर पानातील तिखटपणामुळे जखम अधिक वाढू शकते.

Mouth Ulcer | (Canva Photo)

किडनी स्टोनचा त्रास

पानामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे किडनी स्टोन (खडा) असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते.

लहान मुले

लहान मुलांची पचनशक्ती नाजूक असते, त्यामुळे त्यांना खाऊचे पान देणे टाळावे.

Pudhari Photo

दातांच्या समस्या

दररोज पान खाल्ल्याने दातांवर डाग पडतात आणि हिरड्या कमकुवत होण्याची शक्यता असते.

(Canva Photo)

अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्ती

काही लोकांना पानातील घटकांमुळे त्वचेवर खाज किंवा पुरळ येण्याची शक्यता असते.

येथे क्लिक करा...