पुढारी वृत्तसेवा
भावना पूर्णपणे व्यक्त न झाल्यास किंवा सतत दाबून ठेवल्यास त्याचा परिणाम केवळ मनावरच नव्हे, तर शरीरावरही होतो, असे आयुर्वेद आणि योगशास्त्र सांगतात.
राग, भीती, चिंता किंवा दुःख यांसारख्या भावना दीर्घकाळ दडपून ठेवल्यास त्याचा परिणाम शरीरातील विविध अवयवांवर होऊ शकतो.
आयुर्वेदानुसार व्यक्त न झालेल्या भावनांना 'आम' म्हटले जाते. 'आम' म्हणजे शरीरात साचणारे विषारी घटक. हे केवळ चुकीच्या आहारामुळेच नव्हे, तर मनात साचलेल्या, व्यक्त न झालेल्या भावनांमुळेही निर्माण होऊ शकतात.
योगशास्त्रातही शरीर आणि मन यांना वेगळे मानले जात नाही. मनात दीर्घकाळ राहणाऱ्या भावना हळूहळू शरीरातही प्रतिबिंबित होतात.
कोणती भावना कोणत्या अवयवावर परिणाम करू शकते? आणि नियंत्रणासाठी योगातील उपाय
राग – यकृत
राग कमी करण्यासाठी : चंद्रभेदन प्राणायाम – शरीरातील उष्णता आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यास मदत.
दुःख – फुफ्फुसे
दुःखातून सावरण्यासाठी : उष्ट्रासन – छाती खुली करून भावनिक ताण हलका करण्यास उपयुक्त.
भीती – मूत्रपिंड
भीती कमी करण्यासाठी : अनुलोम-विलोम प्राणायाम – मन शांत करून सुरक्षिततेची भावना वाढवते.
चिंता – पोट
चिंता कमी करण्यासाठी : पश्चिमोत्तानासन – अस्थिर मन स्थिर करण्यास मदत करते.
अतिआसक्ती – हृदय
अतिआसक्ती कमी करण्यासाठी : 'ॐ' मंत्राचा जप – मन शांत करून भावनिक संतुलन साधण्यास सहाय्यक ठरतो.