पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
बाबासाहेब आणि रमाबाई यांचा विवाह एप्रिल १९०६ मध्ये झाला.
हे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात, मासळी बाजाराजवळ अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले.
लग्नाच्या वेळी बाबासाहेबांचे वय सुमारे १४ ते १५ वर्षे होते.
रमाबाईंचं वय तेव्हा अंदाजे ९ ते १० वर्षे होतं.
त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे लहान वयातच हा विवाह झाला.
लग्न अतिशय साधेपणाने, नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं. मोठा थाटमाट नव्हता.
बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाने “रामू” म्हणत. तर अनुयायी त्यांना “माता रमाई” म्हणून ओळखतात.
संघर्षाच्या काळात रमाबाईंनी बाबासाहेबांना खंबीर साथ दिली. त्यांच्या शिक्षण आणि सामाजिक लढ्यांमध्ये त्या आधार बनून उभ्या राहिल्या.
हे दोघे फक्त पती-पत्नी नव्हते, तर संघर्ष आणि त्यागाचं प्रतीक होते. त्यांनी त्यांच्या कार्याने इतिहास रचला.