सुकामेवा आरोग्यासाठी सुपरफूड मानले जाते, याद्वारे शरीरास अनेक फायदे मिळतात..पण योग्य वेळेतच सुकामेवा खाल्ल्यास अधिक फायदे मिळतील, असे तज्ज्ञ सांगतात. .तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बदाम सकाळच्या वेळेस खावेत. .यातील व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. .यामुळे शरीराची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत मिळते. तसेच, एकाग्रता क्षमताही वाढते. .काही लोक अक्रोड सकाळच्या वेळेस खाणे पसंत करतात; पण तज्ज्ञांच्या मते, अक्रोड सकाळऐवजी संध्याकाळच्या वेळेस खावेत. .अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि मेलाटोनिनचे प्रमाण अधिक असते. .ओमेगा-3 फॅटी अॅसिड मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करते, तर मेलाटोनिनमुळे झोप चांगली येते. .त्यामुळे अक्रोड संध्याकाळच्या वेळेस खाल्ल्यास चांगली झोप मिळेल आणि मेंदूलाही आराम मिळेल.