पुढारी वृत्तसेवा
कार, बाईकसारखी वाहने आपल्यासाठी केवळ प्रवासाचे साधन नसून ती आता जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत.
कोणतेही नवीन वाहन खरेदी करताना त्याचा विमा काढणे हे आता जवळपास अनिवार्य झाले आहे.
परंतु, अनेकजण याकडे केवळ एक औपचारिकता म्हणून पाहतात, तर काहीजण खर्चापोटी विमा काढणे टाळतात.
मोटर विमा हा एक प्रकारे आर्थिक संरक्षणाचे ढाल म्हणून काम करतो.
विमा का आहे आवश्यक?
अपघातात वाहनाचे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत.
वाहन चोरीला गेल्यास त्याची भरपाई मिळते.
पूर, भूकंप किंवा इतर नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश.
आग, तोडफोड किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण.
विमा तुमच्या प्रवासाला सुरक्षित आणि चिंतामुक्त बनवतो. विमा असल्यास, तुम्ही मोठ्या नुकसानीच्या भीतीने प्रवास करणे थांबवत नाही.
जर तुमच्या वाहनाचा विमा नसेल आणि अपघात झाला, तर पीडित व्यक्तीला दिली जाणारी संपूर्ण नुकसानभरपाई वाहन मालकाला स्वतःच्या खिशातून भरावी लागते.