Social Media वापराचे प्रमाण वाढलंय...?; मन स्थिर अन् शांत करण्यासाठी ५ सोपे मार्ग

मोनिका क्षीरसागर

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर प्रमाणाबाहेर वाढला आहे, ज्यामुळे अनेकदा मानसिक थकवा जाणवतो

डिजिटल डिटॉक्सची वेळ ठरवा

दिवसातून किमान १-२ तास मोबाईलपासून पूर्णपणे दूर राहा, विशेषतः झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर लगेच

नोटिफिकेशन बंद ठेवा

अनावश्यक ॲप्सचे नोटिफिकेशन बंद केल्यामुळे वारंवार फोन तपासण्याची सवय कमी होईल आणि एकाग्रता वाढेल

नकारात्मकतेपासून दूर राहा

जे घटक किंवा अकाउंट्स तुम्हाला तणाव देतात, त्यांना अनफॉलो किंवा म्यूट करा; फक्त सकारात्मक मजकूर पाहा

वाचनाची सवय लावा

स्क्रीनवर वेळ घालवण्यापेक्षा एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचा, यामुळे विचारांना नवी दिशा मिळते आणि मन शांत होते.

निसर्गाच्या सानिध्यात राहा

रोज थोडा वेळ बागेत किंवा मोकळ्या हवेत फिरायला जा; निसर्गाशी जोडले गेल्याने मानसिक ताण आपोआप कमी होतो.

तुलना करणे थांबवा

सोशल मीडियावरील इतरांचे 'दिखाऊ' आयुष्य पाहून स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नका, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो.

छंद जोपासा

चित्रकला, संगीत किंवा स्वयंपाक यांसारख्या आवडीच्या कामात स्वतःला गुंतवा, ज्यामुळे मनाला एक वेगळाच आनंद मिळेल.

ध्यानधारणा (Meditation) करा

रोज फक्त १० मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा, हे मनाच्या स्थिरतेसाठी रामबाण उपाय आहे.

येथे क्लिक करा...