महानगरांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. .नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे या आजारांचे प्रमाण वाढत आहे. .प्रौढ वर्गामध्ये 'टाइप २' मधुमेहाचा प्रकार अधिक आढळत आहे. .एका सर्वेक्षणानुसार, लठ्ठ आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये 'टाइप २' मधुमेहाचा धोका अधिक असतो. .३० वर्षांवरील बैठे काम करणाऱ्यांनी रक्तातील साखर आणि रक्तदाबाची चाचणी करणे आवश्यक आहे..उपाय काय?प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळावे, त्यावरील सूचना वाचावी, दैनंदिन आहारात साखरेचा वापर कमी करावा..मिठाचा कमी प्रमाणात वापर करावा. नियमित व्यायाम, कमीत-कमी अर्धा तास चाला आणि योगा अभ्यास करा.