जेवणात सतत चपाती पोळीच खाताय? आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

मोनिका क्षीरसागर

तुम्हीही रोजच्या जेवणात फक्त चपाती किंवा पोळीच खाताय का?

अनेकांच्या आहारात चपाती हा मुख्य घटक असतो, पण त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते (Blood Sugar)

गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने, सतत चपाती खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

वजन वाढण्याची समस्या (Weight Gain)

जर तुम्ही व्यायामाशिवाय जास्त प्रमाणात चपात्या खात असाल, तर त्यातील कॅलरीजमुळे पोटाचा घेरा आणि वजन वाढू शकते.

पचनाच्या तक्रारी आणि ब्लोटिंग (Digestion Issues)

गव्हामध्ये असलेल्या 'ग्लूटेन'मुळे अनेकांना गॅस, अपचन आणि पोट फुगल्यासारखे वाटण्याच्या समस्या जाणवतात.

थकवा आणि आळस जाणवणे (Lethargy)

जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्याने इन्सुलिनची पातळी वाढते, ज्यामुळे जेवणानंतर लगेच सुस्ती किंवा आळस येतो.

शरीरातील पोषक तत्वांचे असंतुलन

फक्त चपातीवर भर दिल्याने शरीराला आवश्यक असलेली इतर धान्ये (जसे की बाजरी, ज्वारी, नाचणी) मधील फायबर आणि खनिजे मिळत नाहीत.

हृदयाच्या आरोग्यावर परिणाम

मैदायुक्त किंवा अतिप्रमाणात गहू खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो.

आहारात विविधता आणा...

तज्ज्ञांच्या मते, रोजच्या जेवणात फक्त गहू न ठेवता ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.