पुढारी वृत्तसेवा
ऊन-पावसाचा लपंडाव!
श्रावणातील सतत बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अचानक कमी होऊ शकते.
अचानक येणाऱ्या पावसामुळे भिजल्याने सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका झपाट्याने वाढतो.
या ऋतूत हवेतील दमटपणा वाढल्याने पचनक्रिया मंदावते आणि खाल्लेले नीट पचत नाही.
ऊन आणि दमट हवेच्या खेळामुळे त्वचेवर रॅशेस, खाज सुटणे किंवा संसर्ग होण्याची शक्यता बळावते.
वातावरणातील थंडाव्यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो आणि शरीरात सतत आळस जाणवतो.
ऊन न जाणवल्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे शरीर नकळत डिहायड्रेट होते.
हवामानातील बदलांचा थेट परिणाम मुड आणि ऊर्जेवर होतो, ज्यामुळे सतत थकवा जाणवू शकतो.