पुढारी वृत्तसेवा
शंख वाजवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण शंख वाजवताना नियम पाळणं महत्त्वाचं आहे
हिंदू धर्मात शंखनाद शुभ मानला जातो. पूजा, आरती आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात यानेच केली जाते
सकाळी सूर्योदयाच्या वेळी शंख वाजवणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते
सूर्यास्ताच्या वेळी शंख वाजवल्याने दिवसभरातील नकारात्मकता दूर होते. घरात शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते
आरती, हवन किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला शंख वाजवणं शुभ आहे, विशेषतः संध्याकाळच्या आरतीत याला अधिक महत्त्व
शंख वाजवल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते. श्वसनसंस्था मजबूत होते आणि शरीराला फायदा होतो
शंखाच्या आवाजामुळे वातावरणातील सूक्ष्म जंतू कमी होण्यास मदत होते. म्हणजेच वातावरण शुद्ध राहते
रात्री शंख वाजवणं अशुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
अंघोळ न करता शंख वाजवू नका, घाण जागेवर शंख ठेवू नका, तुटलेला शंख वापरू नका.
नोंद : यातील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितींवर आधारित आहे.