पुढारी वृत्तसेवा
मिठाशिवाय सर्व मसाले व्यर्थ ठरतात, म्हणून स्वयंपाकघरात मिठाला 'सर्व रसांचा राजा' मानले जाते.
अतिरिक्त मीठ खाल्ल्याने जठर आणि आतड्यांच्या श्लैष्मिककलेचे नुकसान होते. त्यामुळे मीठ नेहमी योग्य प्रमाणातच खावे.
शरीरातील अतिरिक्त क्षार बाहेर काढताना किडनी आणि इतर अवयवांवर प्रचंड ताण पडतो, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
आयुर्वेदानुसार, मिठाच्या अतिसेवनामुळे लवकर वृद्धत्व येते आणि पुरुषत्वाशी संबंधित तक्रारीही उद्भवू शकतात.
अल्प प्रमाणात मीठ खाल्ल्यास ते पचनशक्ती (अग्नी) प्रदीप्त करते तसेच कफ व पोटातील कृमी नष्ट करण्यास मदत होते.
गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने गळा दुखणे, टॉन्सिल्स आणि गळ्याची सूज कमी होण्यास मदत होते.
रात्री खोकल्याची ढास लागल्यास मिठाचा लहान खडा तोंडात धरल्याने खोकला थांबण्यास मदत होते.
आले, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून सेवन केल्यास अपचन, पोटदुखी आणि गॅसची समस्येत आराम मिळतो.
मोहरीच्या तेलात मीठ कालवून दातांवर चोळल्यास किंवा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने दाढदुखी आणि पायोरियात फायदेशीर ठरते.
मार लागल्यास किंवा पाय मुरगळल्यास मीठ आणि हळद पाण्यात बारीक वाटून त्याचा लेप लावल्याने वेदना कमी होतात.