Child Care: आई-वडिलांच्या 'या' ५ सवयींना मुले प्रचंड घाबरतात

पुढारी वृत्तसेवा

आपल्यामुळे मुलाला कोणताही त्रास व्हावा असे कोणत्याही पालकाला वाटत नाही. ते नेहमीच आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात.

file photo

परंतु, अनेकदा नकळत त्यांच्याकडून काही चुका होतात. पालकांच्या दैनंदिन जीवनातील या लहान-लहान चुका मुलांसाठी तणावाचे कारण बनू शकतात.

file photo

मुले सतत भीतीखाली आणि दडपणाखाली राहू लागतात. असे असूनही, आपले मूल इतके गप्प किंवा तणावात का आहे, याची पालकांना पुसटशी कल्पनाही नसते.

file photo

याच विषयावर पॅरेंटिंग एक्सपर्ट इशिन्ना बी. सदाना यांनी अलीकडेच एका व्हिडिओमध्ये पालकांच्या अशा काही सवयींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे मुलांमधील तणाव वाढतो.

file photo

१. मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे

त्यांच्या मते, पालकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ते मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात.

file photo

२. छोट्या गोष्टींवर ओव्हररिएक्ट करणे

काही पालक छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप तीव्र प्रतिक्रिया देतात आणि मुलांवर जोराने ओरडू लागतात. याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो आणि त्यांच्यातील भीती वाढते.

file photo

३. मुलांना धमकावणे

अनेक पालक आपली गोष्ट ऐकवण्यासाठी किंवा मुलांकडून काम करून घेण्यासाठी त्यांना धमकावतात. अशा प्रकारच्या धमक्यांमुळे मुलांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.

file photo

४. मुलांच्या भावना समजून न घेणे

पालक वारंवार मुलांना प्रत्येक कामासाठी घाई करायला लावतात, जसे की ‘लवकर कर, आपल्याला उशीर होतोय.’ ही देखील एक चूक आहे.

file photo

तसेच, मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांची अडचण न समजता ‘काही झाले नाहीये, रडू नकोस, शांत बस’ असे म्हणणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

file photo