पुढारी वृत्तसेवा
चटकमटक खाण्याची आवड असणार्यांना पाणीपुरी खायला हटकून आवडते.
आता तर त्यांना पाणीपुरी खाण्यासाठी आरोग्याचेही एक निमित्त सांगता येऊ शकते! पुदिना, चिंच, आले आणि कोथिंबीर यांपासून बनवलेले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
पाणीपुरीच्या पाण्यात चिंच आणि आले टाकलेले असते.
यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि हृदयाचे आरोग्यदेखील सुधारण्यास मदत होते.
पाणीपुरीच्या पाण्यातील पुदिना आणि कोथिंबीरमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यात मदत होते तसेच यकृत आणि पचनसंस्था मजबूत बनते.
पाणीपुरीचे पाणी पोटातील गॅस आणि अपचन दूर करण्यास मदत करते.
पाणीपुरीच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंटस् आणि जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
पुदिना आणि कोथिंबीर यांच्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात.
यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. पाणीपुरीची गोड आणि आंबट चव मेंदूमध्ये हॅप्पी हार्मोन्स सोडते. त्यामुळे तणाव कमी होतो!