शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे मनाचे आरोग्य! मानसिक स्वास्थ्य हे यशस्वी आणि आनंदी जीवनाचा पाया आहे..नोकरी, व्यवसायातील स्पर्धा, कामाचा दबाव, डेडलाइन्स यामुळे मानसिक थकवा वाढतो, जो तणावाचे प्रमुख कारण आहे..सतत इतरांशी तुलना करणे, ऑनलाइन राहण्याची सक्ती यामुळे एकटेपणा आणि मानसिक अस्वस्थता वाढते..कौटुंबिक जबाबदाऱ्या, नातेसंबंधातील मतभेद आणि आर्थिक अस्थिरता यामुळे मनावरचा भार वाढतो..सतत चिडचिड, झोप न लागणे, कामात लक्ष न लागणे, उत्साह कमी होणे, नकारात्मक विचार येणे ही मानसिक तणावाची लक्षणे .दररोज काही वेळ हिरवळीत फिरा, ध्यान किंवा योग करा. यामुळे मन शांत होते आणि विचारांना सकारात्मक दिशा मिळते..आपल्या भावना मनात दाबून ठेवू नका. मित्र, कुटुंबीय किंवा विश्वासू व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला. .पौष्टिक आहार, ७-८ तासांची पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक आहेत..लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.