पुढारी वृत्तसेवा
सकाळच्या चहापासून ते पॅकबंद पदार्थांपर्यंत आपण प्रचंड प्रमाणात साखर खातो. पण हीच साखर शरीरासाठी विषासारखी काम करते. जाणून घ्या, फक्त १४ दिवस साखर सोडल्यास काय होते!
जेव्हा तुम्ही साखर खाणे बंद करता, तेव्हा सुरुवातीचे २ ते ३ दिवस खूप कठीण जाऊ शकतात. या काळात शरीराला साखरेची सवय असल्याने काही लक्षणे दिसू लागतात.
सुरुवातीच्या दिवसांत शरीरातील ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटते. यामुळे डोकेदुखी, चिडचिड, थकवा आणि वारंवार काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते.
साखर सोडल्याच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशीच काही लोकांच्या शरीरातील अतिरिक्त पाण्याचे वजन (Water Weight) कमी होते. त्यामुळे शरीरातील जडपणा कमी होऊन हलके वाटू लागते.
पहिल्या दोन दिवसांत गोड खाण्याची इच्छा अनावर झाल्यास आहारात प्रोटीन (प्रथिने) आणि फायबरचे (तंतुमय पदार्थ) प्रमाण वाढवा. भरपूर पाणी प्या आणि ज्यूसऐवजी थेट फळे खा.
जर तुम्ही ३ दिवस स्वतःवर नियंत्रण ठेवले, तर चौथ्या आणि पाचव्या दिवसापासून शरीराच्या चयापचय क्रियेत (Metabolism) बदल दिसू लागतात. रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिनची पातळी स्थिर होऊ लागते.
या काळात साखरेची क्रेव्हिंग पुन्हा वाढू नये म्हणून चहा, बिस्किटे, केक, कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेट स्नॅक्स खाणे पूर्णपणे टाळा. अन्यथा पुन्हा गोड खाण्याची इच्छा होईल.
दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करताच शरीरातील ब्लड शुगर पूर्णपणे नियंत्रित होते. मेंदूतील 'डोपामाइन सिग्नल्स' री-कॅलिब्रेट होतात, ज्यामुळे गोड खाण्याची इच्छा स्वतःहून नष्ट होते.
१४ दिवसांच्या या चॅलेंजमध्ये तुम्ही फळे नक्कीच खाऊ शकता. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते आणि त्यासोबतच फायबर, जीवनसत्त्वे व खनिजे असल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, हे १४ दिवसांचे चॅलेंज वजन कमी करण्यासाठी नाही, तर शरीराला अंतर्गत डिटॉक्स करण्यासाठी आहे. आजच हे चॅलेंज स्वीकारा आणि निरोगी व्हा!