लग्न करण्यापूर्वी अनेक मुलींना हरतालिका किंवा यासारखे महादेवांशी संबंधित उपवास करायला सांगितले जातात..अनेकदा विवाहोत्सुक तरुणीही महादेवांसारखा पती मिळावा यासाठी उपास तपास करताना दिसतात.उत्तर भारतातील अनेक लग्नामध्ये शिव पार्वतीच्या लग्नासंदर्भात अनेक गाणी गायली जातात.देवी पार्वतीचे केलेले उपवास चांगल्या पतीची मनोकामना धरून केले जातात.शिव आणि पार्वती या आदर्श जोडप्यांप्रमाणे आपलाही संसार व्हावा अशी प्रार्थनाही केली जाते.यामागे कारण आहे हे शिवाचे पार्वतीवर असलेले प्रेम.योगी असलेले शिव पार्वतीची तपश्चर्या आणि समर्पण पाहून प्रभावित झाले आणि त्यांनी संसारी बनण्याचा निर्णय घेतला.श्रीराम आणि कृष्ण यांचे प्रेम अनुक्रमे कर्तव्य आणि इतर पत्नी यांच्यात विभागले गेले आहे .पण महादेवाचे तसे नाही. मृत्यू पावलेली सती पुढील जन्मात पार्वती बनते तेव्हा ते तिच्याशी विवाह करतात.पत्नीवर सर्वात जास्त प्रेम करण्याच्या महादेवांच्या या गुणांमुळेच अनेकदा महादेवांसारखा पती मिळावा यासाठी व्रत वैकल्य करतात.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.