सकाळी रिकाम्या पोटी ‌‘हे‌’ खाऊ नये, नाहीतर...

पुढारी वृत्तसेवा

अनेकजण हलका नाश्ता घेऊन दिवसाची सुरुवात करतात.

काहीजण चहाने दिवसाची सुरुवात करतात. काहींना कॉफी आवडते.

असे काही पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी कधीच खाऊ नयेत, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

सकाळी उठल्यानंतर लगेच खाल्लेले काही पदार्थ पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात.

सकाळी उठल्यानंतर आंबट फळे खाणे टाळावे. जसे की, संत्री आणि लिंबू. लिंबूवर्गीय फळे

अशी फळे जास्त आम्लयुक्त असल्याने आम्लपित्त, छातीत जळजळ आणि गॅस होऊ शकतो.

रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे ॲसिड निर्माण करू शकते. छातीत जळजळ, पोट फुगणे, अस्वस्थता जाणवू शकते.

सकाळी जड, तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने गॅस, अपचन दिवसभर जडपणा जाणवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.