पावसाळा सुरू झाला आहे. या ऋतूमध्ये आपल्या खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे..आरोग्यतज्ज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही मक्याच्या कणसाचे सेवन करू शकता, असे आहारतज्ज्ञ सांगतात..मक्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंटस् आणि व्हिटॅमिन सी असते, जे शरीराला आजारांपासून वाचवते..मक्यात असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करते..कणीस शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते..फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि कॅलरीज लवकर बर्न होतात..कार्बोहायड्रेटस् आणि नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देतात..कणीस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो..कणसामधील जीवनसत्त्वे पेशींना नवसंजीवनी देतात..हंगामी सर्दी, ताप, संसर्ग यांचा धोका कमी होतो..भिजत्या पावसात भाजलेले किंवा उकडलेले कणीस खाणे म्हणजे एक खास आनंद असतो.