पुढारी वृत्तसेवा
अंदमान-निकोबार भारतात कसे राहिले?
आरमार प्रमुख कान्होजी आंग्रेंच्या पराक्रमाशी जोडली जाते एक ऐतिहासिक कथा.
अंदमानचा पहिला उल्लेख कुठे?
अंदमान बेटांचा उल्लेख प्राचीन चिनी साहित्यात आढळतो. भारताकडे येणाऱ्या एका चिनी व्यापाऱ्याचे जहाज भरकटून या बेटांवर पोहोचल्याची नोंद आहे.
'येनटोमेन' ते अंदमान
चिनी प्रवाशांनी या बेटांचा उल्लेख 'येनटोमेन' असा केला होता. पुढे काळाच्या ओघात हेच नाव बदलत जाऊन 'अंदमान' झाले.
चोल राजांनीही केला होता वापर
इतिहासकारांच्या मते, दहाव्या शतकात चोल राजा राजेंद्र चोलाने सुमात्रा मोहिमेसाठी या बेटांचा वापर केला होता.
भारतात नौदलाची कमतरता
मध्ययुगीन काळात भारतात अनेक सामर्थ्यवान राजे होते. पण बहुतांश राज्यांकडे मजबूत आरमार नव्हते.
शिवाजी महाराजांची दूरदृष्टी
समुद्रमार्गे होणारा परकीय धोका ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली.
मराठी आरमाराची धुरा कान्होजींकडे
शिवरायांनंतर मराठी नौदलाचे नेतृत्व आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या हाती आले. त्यांनी आरमाराला अभूतपूर्व बळ दिले.
समुद्रावर मराठ्यांची सत्ता
मुंबईपासून वेंगुर्ल्यापर्यंतचा किनारा, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातही कान्होजी आंग्रेंचा प्रभाव होता.
इंग्रजांनाही पडला होता प्रश्न
कान्होजी आंग्रेंच्या धाडसी मोहिमांमुळे इंग्रज त्रस्त झाले होते. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा याची चिंता लंडनपर्यंत पोहोचली होती.
इतिहास आणि दाव्यांची पडताळणी महत्त्वाची
अंदमान-निकोबार बेटांबाबत कान्होजी आंग्रेंशी संबंधित अनेक लोकप्रिय कथा सांगितल्या जातात. मात्र इतिहासकारांच्या मते, अशा दाव्यांची पडताळणी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे करणे आवश्यक आहे.
संदर्भ
लेफ्टनंट जनरल जे. एस. बाजवा यांचे 'इंडियन डिफेन्स रिव्ह्यू' हे पुस्तक