Chanakya Niti: माणसाला 'या' ३ गोष्टींचा हाव उद्ध्वस्त करू शकतो!

पुढारी वृत्तसेवा

असा क्वचितच एखादा व्यक्ती असेल ज्याचे आयुष्य संघर्षाने भरलेले नाही. संघर्ष हा आयुष्याचा असा भाग आहे जो कधीही संपणारा नाही. जो आपल्या संघर्षात आणि कठीण परिस्थितीत न डगमगता सतत पुढे जात राहतो, तोच यशस्वी होतो.

आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रात अशी अनेक सूत्रे सांगितली आहेत, ज्यांच्या मदतीने जीवन यशस्वी होऊ शकते.

नीतिशास्त्रात अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या माणसाला उद्ध्वस्त करू शकतात आणि अशा तीन गोष्टी ज्यांच्याबाबत माणसाने कधीही समाधानी राहू नये.

या ३ गोष्टींबाबत कधीही समाधानी राहू नका

१. दान

दान करण्याबाबत कधीही समाधानी असू नये (म्हणजेच दान करणे कधीही सोडू नये). दान केल्याने माणसाची पापे नष्ट होतात आणि अशा लोकांवर देवाची कृपा कायम राहते.

२. विद्या

माणसाने विद्याभ्यास म्हणजेच शिकण्याबाबत कधीही समाधानी राहू नये. तुम्ही जितके जास्त ज्ञान संपादन कराल, तितके तुमचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल.

३. नामस्मरण

देवाचे नाव घेताना किंवा जप करताना कधीही समाधानी होऊ नका. जो व्यक्ती खऱ्या मनाने देवाचे नाव घेतो, तो एक दिवस नक्कीच यशस्वी होतो.

या ३ गोष्टींची हाव आणते विनाश

१. पत्नी

व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत नेहमी समाधानी राहावे. परस्त्रीवर नजर ठेवणारा माणूस एक दिवस नक्कीच उद्ध्वस्त होतो.

२. भोजन

उत्तम जेवणाच्या हव्यासापोटी वेळ वाया घालवू नये. जे काही अन्न मिळाले आहे, त्यात समाधानी राहिले पाहिजे.

३. धन

आपल्याकडे जे काही धन आहे, त्यात समाधानी असावे. अधिक मिळवण्याचा हव्यास आणि चुकीचा मार्ग नेहमी विनाशाकडे घेऊन जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.