पुढारी वृत्तसेवा
विरुद्ध आहार म्हणजे काय?
आयुर्वेदानुसार काही पदार्थ एकत्र खाल्ल्यास ते शरीरासाठी अपायकारक ठरतात, यालाच ‘विरुद्ध आहार’ म्हणतात.
दूध + फळे (विशेषतः आंबट फळे)
दूध आणि आंबट फळे एकत्र खाल्ल्यास पचन बिघडू शकते आणि अॅसिडिटी वाढू शकते.
मासे + दूध
हे कॉम्बिनेशन त्वचेच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे आयुर्वेदात टाळण्याचा सल्ला दिला आहे.
दही + गरम पदार्थ
गरम अन्नासोबत दही खाल्ल्यास पचनावर परिणाम होऊन कफ वाढू शकतो.
फळे + जेवण
जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्यास गॅस, अपचन आणि फुगणे होऊ शकते.
मध + गरम पाणी/गरम पदार्थ
आयुर्वेदानुसार मध गरम केल्यास त्याचे गुणधर्म खराब होतात आणि शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
तूप + मध समान प्रमाणात
तूप आणि मध समान प्रमाणात एकत्र घेणे टाळावे असे आयुर्वेद सांगतो.
पचनावर होणारा परिणाम
अशा चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे पचन बिघडते आणि शरीरात टॉक्सिन्स वाढतात.
योग्य आहाराची सवय लावा
योग्य फूड कॉम्बिनेशन निवडल्यास आरोग्य चांगले राहते.