पुढारी वृत्तसेवा
आपण अनेकदा आहाराकडे लक्ष देतो, पण 'झोप' या महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करतो.
आयुर्वेदामध्ये झोप म्हणजे केवळ विश्रांती नसून, ते शरीर आणि मनाला पुन्हा ताजेतवाने करण्याचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
'अष्टांग हृदय' आणि 'चरक संहिता' या प्राचीन ग्रंथांमधील संदर्भांनुसार, रात्रीच्या दिनचर्येचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर आणि मानसिक एकाग्रतेवर होत असतो.
जेव्हा झोपेची वेळ अनियमित होते, तेव्हा त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसाच्या भूकेवर, ऊर्जेवर आणि एकाग्रतेवर होतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर आणि जड जेवण यामुळे शरीराचे नैसर्गिक चक्र बिघडते.
आयुर्वेदानुसार रात्रीची दिनचर्या सुधारण्यासाठी काय करावे?
रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करा.
झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा टीव्हीचा वापर कमी कराव.
दररोज एकाच निश्चित वेळी झोपा.
रात्री उशिरा जास्त खाण्याच्या सवय टाळा.
हे ७ दिवसांसाठी करून पहा आणि तुमच्या सकाळचे निरीक्षण करा.
सकाळी ताजेपणा वाढतो.
भूक लागण्याच्या वेळेत नियमितता.
पचन संस्था हलकी आणि कार्यक्षम होणे.
कामात वाढलेली एकाग्रता.