पुढारी वृत्तसेवा
पारंपारिक पद्धतीने वड्या किंवा आगऱ्याचा प्रसिद्ध पेठा बनवण्यासाठी वापरला जाणारा हा कोहळा प्रत्यक्षात औषधी गुणांचा खजिना आहे.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोहळ्याचा रस प्यायल्याने शरीरातील अनेक गंभीर आजार दूर होण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार, पांढऱ्या कोहळ्याचा प्रभाव हा थंड असतो. त्यामुळेच शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या दिवसांत याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
कोहळ्याचा रस पिण्याचे फायदे:
हा रस शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्यास मदत करतो.
याच्या सेवनाने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो.
याचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते, तसेच वजन कमी करण्यास मदत होते.
शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून किडनीची स्वच्छता करण्यासाठी कोहळा अत्यंत प्रभावी आहे.
यात ९६% पाणी असल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.