पुढारी वृत्तसेवा
आपल्या शरीरात ७०% पाणी असते. पण अनेक लोक दिवसभरात ५-६ लिटर पाणी पिऊनही शरीराला योग्य हायड्रेशन मिळत नाही.
जर पाणी चुकीच्या पद्धतीने पिले, तर ते शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचत नाही. यामुळे किडनी स्टोन, कमजोरी आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
रात्रीच्या विश्रांतीनंतर शरीर डिहायड्रेट झालेले असते. सकाळी उठून २ ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि मेटाबॉलिझम वेगाने काम करू लागते.
गटगट पाणी पिण्याऐवजी हळूहळू सिप करून पाणी प्या. यामुळे शरीर पाणी व्यवस्थित शोषून घेऊ शकते.
उभे राहून किंवा चालता-चालता पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आयुर्वेदानुसार नेहमी शांतपणे बसूनच पाणी प्यावे.
शांतपणे बसून पाणी प्यायल्याने ते शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते आणि पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पाचक रस पातळ होतात आणि पचनक्रिया मंदावते.
जेवण झाल्यानंतर किमान १ तासाने पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.
खूप तहान लागेपर्यंत थांबल्यास शरीरात पाणी कमी झाले आहे असा अर्थ होतो. त्यामुळे दर तासाला थोडे-थोडे पाणी पिण्याची सवय लावा.
ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. आरोग्याशी संबंधित कोणत्याही गंभीर समस्येसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.