पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन केले. -
राष्ट्रीय

PM Narendra Modi | 21 वे शतक भारताचेच; 2047 पर्यंत देश विकसित भारत बनेल

आंध्र प्रदेशात 13,430 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

कुर्नूल (आंध्र प्रदेश); पीटीआय : हे 21 वे शतक 140 कोटी भारतीयांचे आहे आणि स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत आपला देश विकसित भारत नक्की बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

देशाच्या ‘मेक इन इंडिया’ परिसंस्थेचे कौतुक करताना ते म्हणाले, सीमेपलीकडील दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईत आपण देशात बनवलेल्या वस्तूंची ताकद पाहिली आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे 13 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, 21 वे शतक भारताचेच असणार आहे, असेही ते म्हणाले.

श्रीशैलम मंदिरात रुद्राभिषेक, श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट

या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदींनी नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलम येथील श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथे त्यांनी पंचामृत वापरून रुद्राभिषेक केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट दिली. हे एक स्मारक संकुल असून येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1677 मधील ऐतिहासिक श्रीशैलम भेटीच्या स्मरणार्थ ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT