नायगांव : नायगांव येथून ट्रॅव्हल्सने कपीलधार तीर्थयात्रेला जात असताना ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात २० भाविक जखमी झाले. यातील पाचजण गंभीर जखमी असून काहींना नांदेड येथे उपचारासाठी हालवण्यात आले. हा आपघात नरसी-नायगांव महामार्गावर रविवारी (दि. २२) सायंकाळी ५ च्या दरम्यान झाला.
रविवारी (ता.२२) सायंकाळी ४० महिला व पुरुष (एम. एच. १२ एफ सी ९०१७) या ट्रॅव्हल्समधून मन्मथस्वामीच्या दर्शनाला निघाले होते. त्यानंतर नरसी-नायगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरून बाहेर येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने या ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक बसली. या धडकेत ट्रॅव्हल्समध्ये खिडकीला बसलेली एक चिमुकली बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात तुकाराम संतराम इबितवार (वय २५), पांडुरंग नागोराव इबितवार (वय २८), सानवी विश्वनाथ लालवंडे (वय ७), विश्वनाथ अशोक लालवंडे (वय २८), महानंदाबाई शिवराज भुरे (वय ४०), लक्ष्मीबाई भुरे (वय ५०), दत्ता लालवंडे (वय ६२), राजेंद्र संभाजी होनराव (वय ५६), रमेश निळकंठ टोंपे, हावगीरराव पिडकोरे (वय ६२), स्वाती विश्वनाथ लालवंडे (वय २७), अंजनाबाई पिंडकोरे, हनमंत लालवंडे (वय ३५), पार्वतीबाई शिवशाम भुरे (वय ४५), बसवदे गोविंद (वय ६०), दिव्या लालवंडे (वय १२), इंदरबाई संभाजी लालवंडे (वय ८०), सुमन डाकोरे (वय ६०), शंकर काशीनाथ भुरे (वय ६०) अदिसह अन्य एक असे २० प्रवासी जखमी झाले.