'वर्ग दोन' जमिनीचा निर्णय होऊनही शासन निर्णय का नाही : कैलास पाटीलांचा सवाल Kailas Patil
धाराशिव

'वर्ग दोन' जमिनीचा निर्णय होऊनही शासन निर्णय का नाही : कैलास पाटीलांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

मराठवाडयातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये करण्याची मागणी ६० वर्षापासूनची होती. यावाव १३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडा विभागातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत या बाबतीत शासन निर्णय निर्गमीत करण्यात आ- लेला नाही. त्यामुळे मागील ६० वर्षांपासूनची असणारी मागणी अद्यापही प्रलंबित आहे. मंत्रिमंडळाच्या बैठीकीत मान्यता मिळून देखील शासन निर्णय अद्याप का निर्गमित झाला नाही, असा प्रश्न आमदार पाटील यांनी विचारला आहे.

मराठवाड्यातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय तत्काळ निर्गमीत करावा, अशी मागणी पाटील यांनी सरकारला केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT