धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
मराठवाडयातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये करण्याची मागणी ६० वर्षापासूनची होती. यावाव १३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाडा विभागातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत या बाबतीत शासन निर्णय निर्गमीत करण्यात आ- लेला नाही. त्यामुळे मागील ६० वर्षांपासूनची असणारी मागणी अद्यापही प्रलंबित आहे. मंत्रिमंडळाच्या बैठीकीत मान्यता मिळून देखील शासन निर्णय अद्याप का निर्गमित झाला नाही, असा प्रश्न आमदार पाटील यांनी विचारला आहे.
मराठवाड्यातील वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय तत्काळ निर्गमीत करावा, अशी मागणी पाटील यांनी सरकारला केली आहे.