कोल्हापूर

कोल्हापूर: आजरा नगरपंचायतीत पाणी प्रश्नावरून ठेकेदार धारेवर

अविनाश सुतार

आजरा: पुढारी वृत्तसेवा : मागील सहा महिने महामार्गाच्या कामामुळे आजरा शहरात कृतीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी बोलविलेल्या बैठकीत शहरवासीय, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात वादंग निर्माण झाला. नागरिकांनी जलवाहिन्या दुय्यम दर्जाच्या असल्याचे महामार्गाच्या ठेकेदाराच्या निदर्शनात आणून देत धारेवर धरले. ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर २५ मार्चपर्यंत रस्ते व पाणी पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली. Azra Nagar Panchayat

यावेळी नौशाद बुढेखान म्हणाले की, अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. प्रशासन बेजबाबदापणे वागत आहे. दर्गा गल्लीत मनमानी पद्दतीने पाणी सोडण्यात येत आहे. राकेश करमळकर म्हणाले की, पाणी प्रश्नाचे प्रशासनाला गांभीर्य नाही. कुशल कर्मचारी संख्या वाढवण्याची गरज आहे. सलिम लतिफ यांनी मुख्याधिकारी हजर राहत नसल्याचे सांगितले. Azra Nagar Panchayat

जेम्स फर्नांडीस म्हणाले की, चाफे गल्लीत अनेक वेळा पाईप फुटली आहे. अनेक वेळा सांगूनही दुरूस्ती केली जात नाही. कामगार उद्धट बोलतात, असा आरोप केला. ठेकेदाराने तत्काळ जलवाहिन्या जोडाव्यात, अशी मागणी दयानंद भोपळे, नाथ देसाई यांनी केली.
माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी माहामार्गाचे काम कधी पर्यंत पूर्ण होणार याची माहिती देण्याची मागणी केली. सुधीर कुंभार यांनी शहरातील काम संथगतीने सुरू आहे. दोन महिने झाले पूलापासून पंचायत समितीपर्यंतच काम सुरू आहे.

ज्येष्ठ नेते अशोक चराटी म्हणाले की, गावातील काम थांबवा, परंतु महामार्गावरील काम वाढवा. पाण्याची लाईन झाल्याशिवाय पाणी सुरळीत मिळणार नाही. पाण्याचे आणि महामार्गाचे काम समन्वयातून करा. परशराम बामणे यांनी महामार्ग होण्याआधीच चार मुलांचा मृत्यू झाला असल्याची आठवण करून दिली. तुकाराम पाटील यांनी काम सुरू करण्याआधी कामाचा फलक लावावा लागतो, तो अद्याप लावलेला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT