पावणेतीन लाख रेशन कार्डधारक ई-केवायसी विना 
रत्नागिरी

Ratnagiri : पावणेतीन लाख रेशन कार्डधारक ई-केवायसी विना

रत्नागिरी जिल्ह्यात 4 लाख 94 हजार 666 जणांची ई-केवायसी झाली मंजूर

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात रेशन दुकानांसाठी ई-केवायसी करणे आता महत्वाचे झाले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. त्यांनी लवकर करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात 4 लाख 94 हजार 666 जणांच्या ई-केवायसीला मान्यता दिली आहे तर 20 हजार 947 जणांची केवायसी रिजेक्ट केली आहे तर 3 लाख 50 हजार 795 जणांच्या ई-केवायसीला मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. अद्याप 2 लाख 85 हजार 795 रेशनकार्ड धारकांनी ईकेवायसी पूर्ण केली नाही. 31 जुलैपर्यंत ई-केवायसी पूर्ण करा, अन्यथा धान्य बंद होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रेशनकार्डला ई-केवायसी करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कित्येक वेळा ई-केवायसीची मुदतवाढ ही देण्यात आली आहे. अद्याप काही लोकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात 2 लाख 85 हजार 795 रेशनकार्डची ई-केवायसी करायची आहे, असे पुरवठा विभागाने म्हटले आहे. त्यामुळे कार्डधारकांनो जुलै अखेरपर्यंत सार्वजनिक वितरण प्रणाली, विविध रेशनदुकानात किंवा घरातून ऑनलाई प्रणाली वापरून आपली ई-केवायसी पूर्ण करावी. अन्यथा रेशनदुकानातून मिळणारे धान्य मिळणार नाही. असा इशारा पुरवठा विभागाच्या वतीने संबंधित शिधापत्रिकाधारकांना देण्यात आला आहे.

जिल्ह्यात अद्याप 2 लाख 85 हजार 795 रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करून घ्यावी. 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत आहे. मुदत संपल्यानंतर लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही.
रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT