टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी रविचंद्रन अश्विनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, सलामीवीर शिखर धवनला संघातून वगळण्यात आले आहे. भारताचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघाचा मेंटर असेल. इंग्लंडमध्ये चमक दाखविणाऱ्या शार्दूल ठाकूरला राखीव खेळाडूत स्थान मिळाले आहे.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक) इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर