मुंबई : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेच्या आटगाव रेल्वे स्थानकात मुंबईच्या बाहेर जाणाऱ्या गोरखपूर एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे मेल एक्सप्रेस आणि लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका प्रवाशाना बसला.
आज (मंगळवार) सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईतून डाउन दिशेला जाणाऱ्या गोरखपूर एक्सप्रेसचे इंजिन आटगाव स्थानकात फेल झाले होते. त्यामुळे गोरखपूर एक्सप्रेस जागीच खोळंबली. यामुळे कसाऱ्याकडे जाणारी लोकल वाहतुकीचे तीनतेरा वाजले. रेल्वे प्रशासनाने इंजिनातील बिघाड दुरुस्त करून एक्सप्रेस मार्गस्थ केली.
हेही वाचा :