नागपूर पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजप आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. विविध पक्ष एकत्र आल्याचा धसका घेतला भाजपने घेतला आहे. असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. मराठा आंदोलकांवर जालन्यात अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. ही दुर्दैवी घटना आहे. या लाठीचार्जचे आदेश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले म्हणून हा लाठीचार्ज करण्यात आला, असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.
मराठा समाज एकत्र येतोय हे पाहून पोलिस अधीक्षकांना बळीचा बकरा बनवून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी, माझ्या बोलण्यात किती तथ्य आहे हे समोर येईल असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
देशमुख म्हणाले, मी स्वतः गृहमंत्री राहिलो आहे. त्यामुळे काही माहिती आम्हालाही मिळत असते. गृहमंत्रालयाकडून आदेश गेल्याशिवाय अशा कारवाया होत नाहीत. प्रफुल्ल पटेल यांच्या विधानावर बोलताना देशमुख म्हणाले, सर्वांना माहित आहे. प्रफुल पटेल आमच्या पक्षात वरिष्ठ नेते होते. आता भाजपचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गुणगान करतं आहेत. ज्यांनी तुम्हाला मोठ केलं, अनेक पदे दिली अशा ८३ वर्षाच्या बापाला त्रास देत आहेत. हे दुर्दैवी आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
हेही वाचा