Latest

भाजपने विरोधकांना टिकू दिल्यास लोकशाही बळकट : फारुख अब्दुल्ला

दिनेश चोरगे

श्रीनगर; वृत्तसंस्था : भाजपने देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. देशातील लोकशाही बळकट आणखीन बळकट करण्यात भाजपने विरोधकांना जिवंत राहू द्यावे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. ते म्हणाले की, 'ईडी'कडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने छापे टाकले जात आहेत.

एक दिवस त्यांनाही अशीच वागणूक मिळेल. त्यांना खरेच लोकशाही हवी असेल तर त्यांना विरोधी पक्ष टिकू द्यावा लागेल. विरोधकांना मारून देश कधीच मजबूत होणार नाही. अनेक विरोधी नेत्यांवर ईडी आणि सीबीआय छापे टाकत आहेत. 2 नोव्हेंबर रोजी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य धोरण प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह आधीच तुरुंगात आहेत. यामुळेच अब्दुल्ला यांनी भाजपबाबत विधान केले आहे. ईडीने सांगितले होते की महादेव बेटिंगच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT