नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहां…' अशीच काहींशी झाली. पण एक खरे ड्रग्ज व्यापार करणारे उंदीर कोणत्याही बिळात लपून बसले तरी त्यांना शोधून काढण्याचं काम सरकारी यंत्रणा करणारच, असा पलवटवार भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. वाघ यांनी ट्विट करून नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.
नवाब मलिक यांनी चार दिवसांपूर्वी टि्वट करून रविवारी मोठा धमाका करणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भाजपचे कार्यकर्ते मोहित कांबोज यांच्यावर गंभीर आरोप केले.
कांबोज यांनी हे खंडणीसाठी आखलेले प्रकरण असल्याचे सांगत गंभीर आरोप केले. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे, मोहित कांबोज, मनीष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा यांनी खंडणीसाठी रचलेला हा कट होता असा आरोप मलिक यांन केला. याबाबत काही पुरावेही सादर केले.
पत्रकार परिषदेनंतर वाघ यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार टीका केली आहे.
'राज्यातील सगळे प्रश्न सोडून कॅबिनेट मंत्री नवाब मलिक आर्यन खानची वकिली करण्यात गुंतले आहेत. मलिक… शाहरूख खानाच्या आणि ड्रग्ज व्यापा-यांच्या मिठाला जागताहेत का असा संशय येतोय…' असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याबरोबरच नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे… 'खोदा पहाड निकला चुहां…' पण ड्रग्ज व्यापार करणारे उंदीर कोणत्याही बिळात लपून बसले तरी त्यांना शोधून काढण्याचं काम सरकारी यंत्रणा करणारच. यंत्रणेकडे असे अनेक सिंघम आहेत. आली रे आली गांजा बहाद्दरांची बारी आली !' असे ट्विट करत इशाराही दिला आहे.